महाराष्ट्र

तलावात अतिक्रमण,भिंत पोखरून जलाशयाला साठ्याला धोका,प्रशासनाचे दुर्लक्ष

भारतीय संघर्ष न्यूज नेटवर्क महाराष्ट्र.....

 

गेवराई !प्रतिनिधी,

तलवाडा गाव तलावाच्या भिंतीच्या अतिक्रमणाचा मुदा ऐरणीवर असून ज्या ठिकाणी तलाव भरून पाणी जायकवाडी च्या उजव्या कॅनॉल मध्ये जाते तेथे टाकलेला मुरुमचा भराव सोमवार रोजी रात्री 8 ते 11 या दरम्यान जेसीबीच्या साहाय्याने अज्ञात चोरटे चोरून नेत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष शेख खिजर यांच्या निदर्शनास आल्या नंतर त्यांनी जिल्हाधिकारी बीड,पोलिस अधीक्षक बीड ,तलवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोज निलंगेकर यांना त्याच बरोबर महसूल चे मंडळ अधिकारी बाबा बडे यांना संपर्क केला परंतु त्यांचा संपर्क झाला नसल्याने गोपनीय शाखेचे विठ्ठल राठोड यांना संपर्क करून माहिती दिली परंतु ते येण्या अगोदर जेसीबी आणि हायवा,आणि चोर पळून गेले.हे चोर चोरी काही करू शकतात,यांना कायद्याचा धाक नाही का अशी परिस्थिती सध्या असून रात्रीस खेळ चाले अशी परिस्थिती सध्या तलवाडा या ठिकाणे सुरू असून कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक संपला काय अशी चर्चा गावात सुरू असून याबाबत दुसऱ्या दिवशी मंगळवारी मंडळ अधिकारी बाबा बडे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केल्याने सर्व प्रकार उघड झाला.
गेवराई तालुक्यातील तलवाडा गाव तलावाचा अतिक्रमणाचा मुद्दा मागील अनेक दिवसा पासून सुरू असून गाव तलवाव संरक्षण भिंती वरील पक्के अनाधिकृत बांधकाम पडण्यात यावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष शेख खिजर,जयदेव शिंगणे,बाळू डहाळे, यासह पदाधिकारी यांनी वेळोवेळी आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला आहे.यासाठी जलसमाधी आंदोलन ही करण्यात आले होते तेव्हा पंचायत समिती प्रशासनाकडून अतिक्रण काढण्यात येईल असे लेखी देण्यात आले होते.

पोलिस प्रशासनाने ही गटविकास अधिकारी यांना याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करून कळवले परंतु याकडे अद्याप पर्यंत भविष्याच्या दृष्टिकोनातून लक्ष देण्यात आलेले नाही ही शोकांतिका आहे.या तलावाच्या पश्चिमेस अनेकांनी अतिक्रमण करून शेत जमीन काढली असून याठिकाणी ऊस,कापूस पिके घेऊन यांना तलावातून विद्युत मोटारीद्वारे पाणी देण्यात येते ही बाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनास सांगितली परंतु अधिकारी यांनी कानाडोळा केला असून वेळ मारून नेली आहे.या तलावाच्या संरक्षणासाठी जी भिंत उभी आहे ती सुरक्षित असावी ही अपेक्षा आहे परंतु याकडे कोणाचे लक्ष नसल्याने याठिकाणहून मुरूम,माती विनापरवाना नेण्याचे काम होते.असाच प्रकार सोमवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष शेख खिजर यांच्या निदर्शनास आला यावेळी त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी साहेब बीड,पोलिस अधीक्षक साहेब बीड,तलवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलंगेकर यांना भ्रमणध्वनी द्वारे कळवण्यासाठी पर्यत्न केले परंतु त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांनी गोपनीय शाखेचे विठ्ठल राठोड यांना संपर्क केला परंतु त्यांनी मी जेवण करत आहे मला वीस ते पंचवीस मिनिट लागतील असे सांगितले.यादरम्यान याठिकाणी अवैध मुरूम उपसा करणारी जेसीबी आणि हायवा निघून गेले. या घटनेमुळे तलवाडा गावात अवैध धंद्यांना बळकटी मिळते का ? अवैध धंद्यावाले कायदा आणि सुव्यवस्था पायदळी दुडवतात का ? यांना कोणाची भीती नाही का ? पोलिस प्रशासनाचा धाक संपला का ? महसूल चे अधिकारी मॅनेज आहेत का ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असून या घटनेने तलावाच्या संरक्षण भिंतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून याठिकाणहून मुरूम,माती चोरून नेणाऱ्या जेसीबी,आणि हायवा यावर तपासणी करून कार्यवाही करण्यात यावी यासाठी मंडळ अधिकारी यांनी तलाठी,ग्रामस्थ, आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आणि सक्षम पंचनामा केला आहे.आता यावर काय कार्यवाही होते याकडे तलवाडा गावकरी आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button